Home क्राईम कोल्हापुरातील सायबर चौकात भरघाव कारने सहा जणांना चिरडले.कार चालकांचे नियंत्रण सुटल्याने भीषण...

    कोल्हापुरातील सायबर चौकात भरघाव कारने सहा जणांना चिरडले.कार चालकांचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू

    212
    0

    पुणे दिनांक ३ जून ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार कोल्हापूर शहरातील सायबर चौकात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे.चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कारने सहा  जणांना चिरडले आहे.या अपघात मध्ये तीन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.तर दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.सदरचा अपघात एवढा भीषण होता की यात कारने धडक दिल्याने काहीजण यावेळी हवेत उडाल्याचे सी सी टिव्ही मध्ये दिसून येत आहे.

    दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कोल्हापूर येथील सायबर चौकात नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते या ठिकाणी एका भरघाव वेगाने येणाऱ्या कार चालकांचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार चालकाने सहा जणांना चिरडले आहे.या अपघातात तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे तर अन्य तीन जण हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने सीटी रुग्णालयात व सीपीआर ‌रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Previous articleमुंबईतील लोअर परळ येथील इमारतीला भीषण आग.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
    Next articleदिल्लीत धावत्या ताज एक्स्प्रेसला भीषण आग.आगीत दोन डब्बे जळून खाक कोणत्याही प्रकारची जीवीतहानी नाही

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here