पुणे दिनांक २५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील डेक्कन येथील पुलाची वाडी भागात अंडा भुर्जीच्या काम करण्यां-या तिघांना विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला होता.यातील तीन जणांच्या नातेवाईकांना प्रशासनाच्या वतीने ५ लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान रात्री मुसळधार पाऊस कोसळत होता.तसेच खडकवासला धरण हे १०० टक्के भरले होते तर धरणातून रात्रीच्या वेळेस पाणी हे मुठा नदीच्या पात्रात सोडले होते.त्यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.दरम्यान पहाटेच्या सुमारास अंडा भुर्जीची गाडी हालवतांना या तीन जणांना विजेचा शॉक लागून १) अभिषेक अजय घाणेकर २) आकाश विनायक माने ३) शिवा जिदबहादुर परिहार ( सर्व रा.पुलाची वाडी डेक्कन पुणे) मृत्यू झाला होता.