Home Breaking News सांगलीत पूरस्थिती परिस्थितीमुळे जिल्हा कारागृहातील ८० खतरनाक गुंडांना कोल्हापूर येथील कारागृहात हलवलं

सांगलीत पूरस्थिती परिस्थितीमुळे जिल्हा कारागृहातील ८० खतरनाक गुंडांना कोल्हापूर येथील कारागृहात हलवलं

156
0

पुणे दिनांक २६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सांगली व कोल्हापूर याभागात मुसाळधार पाऊस कोसळत आहे.त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड प्रमाणावर वाढ झाली आहे.सांगली जिल्हा कारागृहातून आतापर्यंत एकूण ८० खतरनाक कैदी यांना कोल्हापूर येथील कळंबा जेल मध्ये हलवले गेले आहे.सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.यात एकूण ६० पुरुष कैदी तर २० महिला कैदी यांचा समावेश आहे.

दरम्यान सांगली येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.तसेच कोयना धरणातून कृष्णानदीच्या पात्रात पाणी सोडले जात असल्याने कृष्णा नदी ही दुथडी भरून वाहत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर अजून आणखी काही कैद्यांना हलवले जाणार आहे.अशी माहिती मिळत आहे.याच बरोबर कारागृहातील अन्य धान्य कागदपत्रे.शास्त्रात्रे व दारुगोळा सुरक्षित स्थळी हलविण्यात आला आहे. अशी माहिती कारागृह अधीक्षक यांनी दिली आहे.

Previous articleऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात,नदी पात्रात ऑलिम्पिकचे उद्घाटन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघावर नजर
Next articleपुणे पोर्श कार अपघातप्रकरणी न्यायालयात ९०० पानी चार्जशीट दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here