पुणे दिनांक १ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज हवामान विभागाच्या वतीने मुंबई व कोकणात.पश्चिम महाराष्ट्रात तसेच विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. व या कालावधीत प्रवास टाळण्यासाठी देखील हवामान विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान मागिल काही दिवसांपासून पुणे व मुंबई तसेच कोकणात मुसळधार पाऊस कोसळत होता.मध्यंतरी पावसाने विश्रांती घेतली होती.मात्र पुणे शहर व जिल्ह्यात सारख्या स्वरूपाचा पाऊस सुरूच होता आता सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे.आता दोन दिवस विश्रांतीनंतर आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे.पुढील चार दिवस १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वत्र पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे.हवामान विभागाच्या वतीने रायगड.रत्नागिरी .या कोकण पट्ट्यात तसेच सातारा.कोल्हापूर पुणे.गोंदिया चंद्रपूर.विदर्भ.गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.तसेच मुंबई.ठाणे.वर्धा. सिंधुदुर्ग.यवतमाळ . नागपूर.भंडारा.या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.या भागात अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.