पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.दरम्यान सदरच्या पत्रामध्ये एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी योग्य असून त्यांना मुख्यमंत्री करावे.अशी आता नव्याने मागणी केली आहे.दरम्यान आपल्या पावलांवर पाऊल ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण कारी योजनांसहित हिंदुत्व साधूसंत तीर्थक्षेत्र व सकल समाजाच्या विकासासाठी योगदान दिले.असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.