पुणे दिनांक २ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुरुवारी मंत्रालयात महायुतीची कॅबिनेटची बैठक झाली आहे.सदरच्या बैठकीत काही सुरक्षाच्या दुष्टिने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.मंत्रालयात येणारे नागरिक व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना विनासायास.सुलभ प्रवेश मिळावा.आणि सुरक्षा अबाधित रहावी.या करीता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा.असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत.तसेच विधान भवनात नियमित कामासाठी आलेले कर्मचारी व अधिकारी यांना पासेस द्यावेत . तसेच मंत्रालयातील जाळीचे काम पूर्ण करावे. तसेच आक्षेपार्ह वस्तू व इतर साहित्य मंत्रालयात येणार नाही.याची दक्षता घ्यावी.असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत म्हणाले आहेत.