पुणे दिनांक १९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतात खेळवण्यात आलेल्या पहिल्याच खो-खो वर्ल्डकपवर भारतीय महिला संघाने नाव कोरले आहे.यात भारताने नेपाळचा पराभव केला आहे.यात विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतील प्रियांका इंगळे हिने या संघाचे नेतृत्व केले.त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रियांकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार.तसेच शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील अनेकांनी प्रियंकाच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.
दरम्यान पहिल्यांदा खो-खो विश्र्वचषक जिंकल्या बद्दल भारतीय महिला संघाचे अभिनंदन! हा ऐतिहासिक विजय त्यांच्या अतुलनीय कौशल्याचे. तसेच दृढनिश्चयाचे आणि टीमवर्कचे परिणाम आहे. दरम्यान या विजयामुळे भारतातील सर्वात जुन्या पारंपरिक खेळापैकी एक आणखी प्रकाशझोत आला आहे.ज्यामुळे देशभरातील असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे ‘ असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.