पुणे दिनांक १० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दुबईत काल चॅम्पियन ट्रॉफी जिंकून टीम इंडिया थोड्याच वेळापूर्वी मुंबईत पोहोचली आहे.दरम्यान चॅम्पियन ट्रॉफी विजेता इंडिया टीमच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.यावेळी संघातील सर्व खेळाडूचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान विमानातून खाली विमानतळावर इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी पाऊस ठेवताच टीम इंडियाला चिअर करण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात आल्या आहेत.भारतीय क्रिकेट 🏏 संघाने काल रविवारी न्यूझीलंड संघाचा पराभव केला होता.