पुणे दिनांक १५ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून काल धुलीवंदनाच्या दिवशीच तळीरामांनी चक्क मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये आग लावल्याची घटना घडली आहे.दरम्यान तळीरामांनी लावलेल्या या आगीत एकूण अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. दरम्यान या आगीची माहिती मिळताच तातडीने घटना स्थळी अग्निशमन दलाच्या ४ ते ५ घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी अथक परिश्रम करून सदरची आग दीड तासांमध्ये आटोक्यात आणली आहे.दरम्यान काल शुक्रवारी धुलीवंदनाच्या दिवशीच मोठ्या संख्येने तळीराम दहिसर येथील नॅशनल पार्कच्या जंगलात गेले होते.तेव्हा संध्याकाळी कोणीतरी सिगरेट पेटवत असताना सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला असावा असा अंदाज अग्निशमन दलाच्या वतीने लावण्यात आला आहे.