पुणे दिनांक १७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज रात्रीच्या सुमारास महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरात औरंगजेबाच्या कबरीचा वाद दोन गटात तुफान दगडफेक व जाळपोळ पर्यंत पोहोचला आहे. नागपूर येथील महाल चौकात दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली व तेथील वाहने मोठ्या प्रमाणावर पेटवण्यात आली आहे.यात एक जेसीबी पूर्णपणे जळून खाक झाला आहे.तर संतप्त जमावाने पेटवलेली वाहने विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या त्यावेळी आग 🔥 विझवण्यासाठी आलेल्या जवानांना देखील जमावाने दगडफेक केली तसेच मारहाण केली आहे.तसेच दगड फेकीत अन्य पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन्ही गटातील लोकांनी शांतता राखावी असं आवाहन केलं आहे.दरम्यान गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी 👮 अश्रू धुरांच्या नळकांडे फोडण्यात आले आहे.दरम्यान या दंगलबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी नागपुरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.तसेच अफवांवर विश्र्वास ठेवू नका असं देखील म्हटलं आहे.तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.तसेच दगडफेक करणारे लोक हे इमारतीवर लपले आहेत.आता ज्या ठिकाणाहून दगडफेक करण्यात आली तिथे पोलिस सर्च ऑपरेशन करण्यात आले आहेत.तसेच लपलेले लोकांची आता पोलिस धरपकड करत होते.आता पोलिस लोकांना शोधून ताब्यात घेत आहेत.तर काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.आता सध्या परिस्थिती आटोक्यात पोलिसांनी आणली आहे.