पुणे दिनांक १९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून आली आहे. दरम्यान औरंगजेबाच्या कबरीचा वाद उफाळून आल्या नंतर नागपूर येथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळून आला होता.मोठ्या प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती.तसेच पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांवर देखील हल्ला करण्यात आला होता.आता नागपूर शहरात सर्वत्र शांतता आहे.दरम्यान या हिंसाचार प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र एटीएस स्वतंत्रपणे तपास करणार आहे.
दरम्यान नागपूर येथे सोमवारी विश्र्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौक येथे निदर्शने केली होती.व संभाजीनगर येथील औरंगजेब यांची कबर हटवण्याची मागणी केली होती.दरम्यान या आंदोलनात मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या काही ओळी जाळण्यात आल्याची चर्चा सगळीकडे पसरली व नंतर मुस्लिम समुदायाच्या लोकांनी देखील आंदोलन केले.त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत सदर परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र संध्याकाळी दोन्ही गट एकमेकांसमोर आले.तसेच दोन्ही बाजूनं घोषणाबाजी करण्यात आली.दगडफेक झाली व शांत असणा-या नागपूरात हिंसाचार मोठ्या प्रमाणावर झाला.या हिंसाचारात ४० पोलिस कर्मचारी व तीन डिसीपी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.मोठ्या प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहने पेटवून देण्यात आली.तसेच पेट्रोल बाॅम्बच्या देखील मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.तसेच 🗡️ . तलवार.कु-हाडीचा वापर करण्यात आला आहे. पोलिसांनी ५० पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे.आता महाराष्ट्र एटीएसची दहशतवाद विरोधी पथकाने नागपूरात झालेल्या हिंसाचारप्रकरणी आता स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली आहे.असं आता स्पष्ट झाले आहे.तशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान हा हल्ला सुनियोजित होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसं जाहीर केले आहे.दरम्यान या प्रकरणात कोणी आर्थिक मदत केली का याचा देखील तपास नागपूर पोलिस आणि दहशत वादी पथक करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.दरम्यान नागपूरात हिंसाचार नंतर कोतवाली. गणेश पेठ.लकडगंज.पाचपावली.शांतीनगर.तसेच सक्करदरा.नंदनवन.इमामवाडा.यशोधरानगर.व कपिलनगर.या भागात संचारबंदी लागू आहे.