पुणे दिनांक २२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक कृषी क्षेत्रातून अपडेट येत असून. कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवण्या बाबत निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान या बाबत आज शनिवारी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. व तशी रितसर घोषणा देखील केली आहे.मात्र हा निर्णय दिनांक १ एप्रिल पासून लागू होणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्याने कांदा उत्पादक शेतकरी व आणि शेतकरी संघटनांच्या लढ्याला मोठे यश आले आहे.दरम्यान कांद्याचे दर वारंवार घसरत होते.व तसेच कांदा बाहेरच्या देशात विकायचा असल्यास निर्यात शुल्क लागत होते.त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत होते.
दरम्यान हा केंद्र सरकारचा निर्णय महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.तसेच कांदा निर्यात वरील वीस टक्के निर्यात शुल्क दिनांक १ एप्रिल २०२५ पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्राने घेतला आहे .व तशी अधीसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.दरम्यान या निर्णयाचे महाराष्ट्र राज्याचे महायुती सरकार मधील उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.असे अजित पवार यांनी म्हटले आहे.