पुणे १ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनातील आरोपी बीड जिल्ह्यातील कारागृहात आहेत. दरम्यान सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना जेल मधील अन्य कैदी महादेव गिते व त्यांच्या साथीदार यांनी मारहाण केली. त्यानंतर तातडीने जेल प्रशासनाने गीते व त्यांच्या टोळीतील अन्य ४ साथीदार यांना काल दुपारीच कराड याच्या सांगण्यावरूनच छत्रपती संभाजी नगर येथील हर्सूल कारागृहात तातडीने हलविण्यात आले आहे. असा खळबळजनक आरोप कैदी महादेव गीते यांनी केला आहे.
दरम्यान काल सोमवारी दहा वाजण्याच्या सुमारास वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच आम्हाला मारहाण करण्यात आली आहे. तसेच कारागृहात जेल प्रशासन हे वाल्मिक कराड याला जेल मध्ये व्हीआयपी टिटमेंट देत आहे. तसेच जेल मधील मागील ३ ते ४ दिवसांचे सीसीटीव्ही तपसा असे ते म्हणाले आहेत. दरम्यान जेल प्रशासनाच्या वतीने देखील वाल्मिक कराड याला काल जेल मध्ये मारहाण झाली नाही असे म्हटले आहे. त्यामुळे आता नक्की जेल मधील कारागृहात नेमकी मारहाण कोणी केली. हा एक संशय कल्लोळ आहे. तसेच कराड याला बीड येथील जेल मध्ये व्हीआयपी टिटमेंट मिळते. जेल प्रशासन व गृहखात्याकडे कराड याची रवानगी तातडीने मुंबई येथील तुरुंगात करावी अशी मागणी करणार आहे. तसेच महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे आपण स्वतः करणार आहे असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील कारागृहात काल जो राडा झाला आहे. तो वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच झाला आहे. तसेच कराड याने बीड जिल्ह्यातील सर्व लहान मोठे गुंडांना जाणीवपूर्वक बीड जिल्ह्यातील कारागृहात बोलावून घेतले आहे. जवळपास ७० ते ८० गुंड हे वाल्मिक कराड याच्या टोळीतील बीड जिल्ह्यातील कारागृहात तैनात आहेत. तसेच मागील ३ते ४ दिवसांचे सीसीटीव्ही तपसा व यातील दोषीवर तातडीने कारवाई करा तसेच बीड जिल्ह्यातील कारागृहातील वाल्मिक कराड व त्याच्या टोळीतील गुंडांना मुंबई येथील कारागृहात तातडीने हालवावे असे त्यांनी म्हटले आहे.