पुणे १७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काल बुधवारी नाशिक येथे शिवसेनेचा निर्धार मेळावा शिबिर झाले.याच शिबिरामध्ये बोलताना शिवसेना उध्वव ठाकरे यांनी मोठी घोषणा करून मागणी केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचले आहेत.तुम्हाला खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी करा.फक्त निवडणुकीत मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणू नका असे उध्दव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात रायगडा वर आले होते.त्यांनी त्यावेळी रायगडावर बोलताना सांगितले की.छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित करु नका.असे ते म्हणाले होते, म्हणून नाशिक येथील शिबिरात बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक कोपर खिळी मारली आहे.