पुणे २१ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात सर्वत्र पारा वाढला आहे.अनेक ग्रामीण भागात दोन घोट पाण्यासाठी गरीबांना किती तरी लांब पायपीट करावी लागते.तेही पाण्यासाठी जीव मुठीत धरून खोल विहिरीत उतरुन तळातील पाणी काढावे लागत आहे.सरकार कोट्यवधी रुपये खर्च हे टॅकर साठी करत आहे.पण हे पाणी या गरीब लोकांना मिळतं का याच्यावर सरकारचे लक्ष नाही.संपूर्ण महाराष्ट्रात पाण्यासाठी सामान्य माणसाला जीव मुठीत धरून संघर्ष करावा लागत आहे.हे या महायुतीच्या सरकार साठी हे भूषणावह नाही
दरम्यान नाशिक येथील हे चित्र आहे.नाशिक येथे घोटभर पाण्यासाठी महिला दोरीच्या सहाय्याने खोल विहिरीत उतरुन तळातून पाणी काढत आपला जीव धोक्यात घालत आहे.हे सर्व चित्र महाराष्ट्र साठी व महायुती सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.असे काॅग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाव्या साठी हेच महायुतीचे सरकार हजारो कोटी रुपये खर्च करण्या साठी तयार आहे.दरम्यान उत्सावांवर , तसेच अन्य कार्यक्रमांवर उधळपट्टी करायला यांच्याकडे पैसा 💸 आहे.पण ताहनलेल्या गरीब सर्वसामान्य माणसाला प्यायला पाणी देण्यासाठी नाही.? केवळ इव्हेंटबाजी करुन सामान्य जनतेची दिशाभूल थांबवा,असे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे.