पुणे २३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बैसरान येथे काल साडेतीन वाजण्याच्या सुमारास पर्यटकांवर द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने अंदाधुंद गोळीबार केला होता.यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान यानंतर आज तातडीने संरक्षण मंत्रालया मध्ये एक महत्वपूर्ण बैठक झाली आहे.सदरच्या बैठकी नंतर भारतीय सेना.एअरफोर्स.तसेच नेव्हीला अलर्ट रहाण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.तसेच सुट्टीवर असलेल्या जवानांना तातडीने हजर होण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहे.सीडीएस व संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीनंतर हे निर्देश देण्यात आले आहे.