Home Breaking News पाकिस्तानाला तगडा झटका… भारताने घेतला मोठा निर्णय, पाकिस्तानी अधिकारी व नागरिकांना परत...

पाकिस्तानाला तगडा झटका… भारताने घेतला मोठा निर्णय, पाकिस्तानी अधिकारी व नागरिकांना परत जाण्याचा आदेश

110
0

पुणे २३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मू काश्मीर पहलगाम येथील बैसरान व्हाॅलीमधील दहशतवादी हल्ला केल्यानंतर यात २६  पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.त्यानंतर आता भारताच्या वतीने मोठे निर्णय घेतले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सीएससीची बैठक झाली आहे. दरम्यान या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटक यांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे पाकिस्तानच्या हायकमिशनच्या ५ अधिकारी यांना हटवण्यात आले आहे.तसेच भारतातील पाकिस्तानी दूतावास बंद होणार आहे.पाकिस्तांनी राजदूतांनी ४८ तासात तातडीने भारत सोडण्यास सांगितले आहे.

दरम्यान या झालेल्या बैठकीत जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा सीसीएसकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.पहलगाम हल्ल्याची सघसीएसला माहिती देण्यात आली आहे.तसेच सिंधू पाणी करार थांबवला.तसेच अटारी बाॅर्डर बंद करणार पुढच्या ४८ तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा.पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी.तसेच पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळणार नाही.

Previous articleजम्मू काश्मीर पहलगाम हल्ल्यानंतर १ हजार ५०० लोकांना घेतले ताब्यात, मोदींच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची बैठक सुरू
Next articleजगदाळे यांचे पार्थिव आज पहाटे पुण्यातील कर्वेनगर येथे दाखल, कुटुंबाच्या भेटीसाठी पवार दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here