Home अंतर राष्ट्रीय भारताने निर्णय घेतल्यानंतर, भारताविरोधात पाकिस्तानने घेतले हे निर्णय

    भारताने निर्णय घेतल्यानंतर, भारताविरोधात पाकिस्तानने घेतले हे निर्णय

    134
    0

    पुणे २४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २८ पर्यटकांची गोळ्या झाडून निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारताने पाकिस्तानला विरुद्ध काल बुधवारी मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान विरोधात निर्णय घेतले होते.त्यानंतर झोपलेला पाकिस्तान जागा झाला आहे.व भारताच्या विरोधात निर्णय घेतले आहेत.        १) भारतासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे ‌,२) पाकिस्तान कडून वाघा बॉर्डर बंद केली ३) भारताबरोबरचे सर्व व्यापार बंद ४) सर्व भारतीय हे तातडीने पाकिस्तान सोडून जावे ५)शिख तीर्थ यात्रे करुंसाठी कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत.६) तसेच पाकिस्तानने सिमला करार रद्द केला आहे.७)भारताने पाणी थांबवले तर ती युध्दाची घोषणा मानली जाईल , असे पाकिस्तानने यात म्हटले आहे.एकंदरीत भारताने  सिंधू जल करार भारताने रद्द केल्याने पाकिस्तानचे ‘धुवायचे ‘वांदे झाले आहे.त्यामुळे पाकिस्तानच्या पाया खालची वाळू सरकली आहे.त्यामुळे त्यांचा थयथयाट झाला आहे.दरम्यान पाकिस्तान पूर्वीच भारताने एक पाऊल आधीच घेऊन पाकिस्तान विरुद्ध हे ठोस निर्णय यापूर्वीच जाहीर केले आहे.

    Previous articleभारत पाकिस्तान बरोबर क्रिकेट 🏏 खेळणार नाही – बीसीसीआयचा मोठा निर्णय
    Next article‘पहलगाम हल्ला पाकिस्तानेच केला ‘माजी सैनिकाने केली पोलखोल

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here