पुणे २४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तानने पाळलेल्या दहशतवाद्यांनी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला नंतर या गोळीबार मध्ये २८ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला आहे.यानंतर भारत देशाच्या वतीने पाकिस्तानच्या विरोधात कठोर निर्णय घेतले आहेत.दरम्यान बीबीसीच्या उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारत -पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय क्रिकेट 🏏 मालिका होणार नाहीत.असे स्पष्ट केले आहे.दरम्यान यापूर्वी शेवटची द्विपक्षीय क्रिकेट मालिका सन २०१२ व २०१३ मध्ये झाली होती.तेव्हा पासून भारत -पाकिस्तान फक्त आयसीसी स्पर्धा मध्ये एकमेकांबरोबर आले आहेत.भविष्यात या स्पर्धांमध्ये दोन्ही देश एकमेकांसमोर येण्याची शक्यता देखील खूप कमी आहे.