पुणे २४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तानने पाळलेल्या दहशतवाद्यांनी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याने २८ पर्यटक हे गोळीबारात ठार झाले.त्यानंतर भारत सरकारने आता पाकिस्तानी नागरिकांचा पासपोर्ट रद्द केला आहे.त्या मुळे आता पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा फक्त २७ एप्रिल पर्यंतच वैध राहाणार आहे.भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना तातडीने भारत देशातून निघून जाण्यास सांगितले आहे.आता या पुढील काळात स्पार्क व्हिसा देखील पाकिस्तानी नागरिकांना मिळणार नाही.तसेच पाकिस्तान सोबत असलेल्या सिंधू पाणी करार देखील स्थगित केला आहे.तसेच पाकिस्तानी X हॅडल अकाउंट देखील बंद करण्यात आले आहे.