पुणे २६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) जम्मू काश्मीर येथील पहलगाम मधील बैसराणा येथील व्हाॅलीमध्ये २२ एप्रिल रोजी पाकिस्तानने पाळलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात निष्पाप २६ पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला यात त्यांचा मृत्यू झाला होता.या हल्ल्याचा निषेध केला आहे.तसेच दोषींना कोर्टात उभं करणं गरजेचं आहे.असे स्पष्ट केले आहे.तसेच दहशतवाद आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी मोठा धोका आहे.असे आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.दरम्यान पाकिस्तान सध्या या परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून कार्यरत आहे.पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांचा दहशतवादी हल्ल्यात नहाक जीव गेला आहे.