पुणे २८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बैसरान व्हाॅलीमध्ये निष्पाप पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करुन तब्बल २८ पर्यटकांची हत्या केली यानंतर भारत सरकारच्या वतीने कडक निर्णय घेतले व भारतात वास्तव्यास असलेल्या सर्व पाकिस्ता नी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले.त्याची मुदत आज संपली आहे.दरम्यान भारत व पाकिस्तान वाघा-बाॅर्डरवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.यात आता काहींना भारतात यायचय तर काहींना पाकिस्तान मध्ये जायचयं त्यांची आता मोठ्या प्रमाणावर रडारड सुरू आहे
दरम्यान आज एक भारतीय महिला अमृतसरच्या बाॅर्डरवर अक्षरशः स्वतःला संपवण्याची धमकी दिली आहे.तिने यावेळी म्हणाले की माझे लग्न पाकिस्तान मध्ये झाले आहे.आम्ही लाखो रुपये खर्च करून अमृतसर वरुन भारतात आलो आहोत.माझी मुले व पती बाॅर्डर बाहेर गेले आहेत.पण मग मलाच का थांबवले? मला देखील पाकिस्तानमध्ये जायचे आहे. मला सोडले नाही तर,मी विष पिऊन जीव देईन.अशी थेट धमकीच तिने संतप्त होऊन दिली आहे.तर दुसऱ्या पाकिस्तानी महिलेने मला पाकिस्तान मध्ये जाऊद्या अशी विनंती केली आहे.दरम्यान पहलगाम येथे पर्यटक यांच्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारच्या वतीने कडक पावले उचलली आहेत.तसेच भारतात वास्तव्यास असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना ‘चले जाव’ चार इशारा दिला आहे.यानंतर पाकिस्तानी नागरिकांना अश्रू अनावर आले.यात काहीजण भारतीय आहेत व काहीजण पाकिस्तानी आहेत.यात कुणाचा पती आहे.कुणाची आई आहे.कुणाचा नवरा आहे.यात आता अनेक भारतीय नातेवाईकांना त्यांना सोडून जावं लागत आहे.त्यामुळे वाघा-बार्डरवर मोठ्या प्रमाणावर रडारड सुरू आहे.यात अनेक पाकिस्तानी त्यांच्याच सरकारला शिव्याशाप लाखोली वाहत आहेत.