पुणे २८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारत देशाच्या वतीने देण्यात आलेली मुदत संपल्याने सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशात म्हणजे पाकिस्तानमध्ये जाण्याचा आदेश जारी केला आहे.अनेकजण भारतात बेकायदेशीर रित्या राहत आहेत तर काहीजण मेडिकल व्हिसा घेऊन आले होते तर काहीजण लग्न समारंभ तर काहीजण मेडिकल व्हिसा घेऊन बेकायदेशीर राहत होते.आता या सर्वांनची भारत सरकारच्या वतीने हक्कलपट्टी करण्यात आली आहे.या सर्वांना दिलेली मुदत संपली आहे.दरम्यान वाघा-बाॅर्डर वर मोठ्या प्रमाणावर रांगाच रांगा लागल्या आहेत.दरम्यान २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम वैरासन येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भारताच्या वतीने पाकिस्तानच्या विरोधात कठोर निर्णय घेण्यात आले आहे.त्यामुळे भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी करण्यात आली आहे.