पुणे ३० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक सकाळी पाकिस्तानमधून एक खळबळजनक अपडेट आली आहे.जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्या नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या प्रमाणावर तणाव सतत वाढत आहे.भारताच्या कारवाई मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.म्हणून पाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्लाह तरार यांनी अचानकपणे रात्री उशिरा म्हणजे १.३० वाजता पत्रकार परिषद घेतली आहे.व या पत्रकार परिषद मध्ये पाकिस्तानने दावा केला की आम्हाला विश्वनिय सूत्रांकडून तसेच गुप्ताचार यंत्रणा कडून माहिती मिळाली की.जी सूचित करते की भारत पुढील २४ ते ३६ तासांमध्ये लष्करी हल्ला करु शकतो.असे त्यांच्या सूचना मंत्र्यांनी पत्रकार परिषद मध्ये म्हटले आहे.दरम्यान दहशतवाद्यांचा समूळनाश करण्यासाठी अनेक महत्वाच्या देशांनी भारताला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.