पुणे १ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने राज्यांची पुनर्रचना करण्यासाठी सुरुवात केली.सन १९५६ रोजी बाॅम्बे राज्याची स्थापना झाली.यात मराठी व गुजरातीचा समावेश होता.परंतू मिश्र राज्यात मराठी हितांना योग्य स्थान मिळाले नाही.त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली.आंदोलनावेळी १०५ लोक शहीद झाले .सरकारवर मोठ्या प्रमाणावर दबाव वाढला.ज्यामुळे १ में १९६० रोजी बाॅम्बे राज्य महाराष्ट्र -गुजरात स्वतंत्र राज्यांमध्ये विभागले गेले.
दरम्यान महाराष्ट्राच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या स्वतंत्र्या साठी ज्या १०५ हुतात्म्यांनी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी बलीदान देणा-यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र दिन हा भारतातील सर्वात प्रगतशील राज्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे.छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र थांबायला तयार नाही.असे यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.