Home Breaking News अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीतील ऐतिहासिक राज्यमंत्रीमंडाळाच्या बैठकीत, महायुती सरकारचे ११ महत्वाचे निर्णय घेण्यात...

अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीतील ऐतिहासिक राज्यमंत्रीमंडाळाच्या बैठकीत, महायुती सरकारचे ११ महत्वाचे निर्णय घेण्यात आले

148
0

पुणे ६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून.अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर झाली आहे.दरम्यान या बैठकीत महायुती सरकारकडून अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिस्थाळाचे जतन आणि संवर्धनासाठी ६८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान यावेळी घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय या प्रमाणे आहेत.१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जिवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठी सह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी.व सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यान्वित यंत्रणा म्हणून काम करणार.व्यावसायिक चित्रपट असल्याने लागणारा खर्च हा अर्थसंकल्पीय मागण्यांतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.२) राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभिमान राबवणार तसेच आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणार.राज्यातील महिलांच्या आर्थिक.सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशील ता निर्माण करणार, कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे,लिंगभेदात्मक बाबी दूर सारत मुलीं मध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवणार, तसेच बालविवाह मुक्त समाजनिर्मिती लैंगिक -शारीरिक अत्याचाराला  प्रतिबंध करुन हिंसाचारमुक्त कुटूंब आणि समाज निर्मिती, अनिष्ट रूढीचे निर्मूलन, महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयं रोजगाराच्या संधी यातून आर्थिक विकास हे आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणां-या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देणार हे अभियान राबविण्यासाठी १०.५० कोटी रुपये खर्च करणार ३)धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव, तसेच ‘यशंवत विद्यार्थी योजना ‘ म्हणून ही योजना आता राबवणार, दरवर्षी १०.००० विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण, आतापर्यंत यासाठी २८८. ९२ कोटी रुपये वितरित,राजे यशवंतराव होळकर यांनी सन १७९७ ते १८११ या काळात शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक कामे केली.गुरुकुलसारख्या पारंपरिक शिक्षणाला चालना दिली.तसेच लष्करी शिक्षणात शिस्त,नीती आणि नेतृत्व गुणांचा समावेश केला.तसेच शिक्षण सर्वांसाठी खुले केले.राजवाड्यात मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उभारल्या.आता त्यांच्या नावे ही योजना,४) धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या वतीने मुख्यालयाच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला ‘पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर वस्तीगृह योजना ‘ असे नाव देण्यात येणार. राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यलायी धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यां साठी प्रत्येकी २०० क्षमतेची वस्तीगृह असणार तर मुलींसाठी प्रत्येकी १०० क्षमतेचे .नवी मुंबई.पुणे. छत्रपती संभाजीनगर.नाशिक.नागपूर अमरावती येथे वसतीगृह नाशिक येथे काम सुरू.पुणे व नागपूर येथे लवकरच सुरू होणार.या वसतीगृहांना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतीगृह योजना असे नाव ५) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट.विहिरी.पाणिवाटप प्रणालीचे सर्वेक्षण करून त्याच्या जतनासाठी विशेष योजना राबवणार . राज्यात असे ३ ऐतिहासिक तलाव ( चांदवड.व त्र्यंबकेश्वर.मल्हार गौतमेश्र्वर.जेजुरी .) राज्यात अशा १९ विहिरी . राज्यात एकूण ६ घाट.राज्यात एकूण ६ कुंड अशा एकूण ३४ जलाशयाची दुरुस्ती व गाळ काढणे पुनरुज्जीवन, सुशोभीकरण इत्यादी कामे करणार यासाठी ७५ कोटी रुपये खर्च करणार आहे. ६) अहिल्यानगर जिल्ह्यात १०० विद्यार्थीक्षमतेचे नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालया स्थापन करण्यात येणार  तसेच या महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय असे नाव असेल  या साठी ४८५.०८ कोटी रुपये खर्च करणार. जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा, मनुष्यबळासह याठी देण्यात येणार आहे.७) राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्धदी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला अभिवादन म्हणून ५५०३.६९ कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखडे ,तसेच चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन संवर्धन, ६८१. ३२ कोटी रुपये, अष्टविनायक गणपती मंदिराचा जीर्णोद्धार १४७.८१ कोटी ,श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा,१८६५ कोटी,श्री क्षेत्र ज्योतीबा मंदिर विकास आराखडा,२५९.५९, कोटी, श्री  क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखडा,२७५ कोटी रुपये.श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा ,१४४५.९७ कोटी रुपये.श्री क्षेत्र माहुरगड विकास आराखडा,८२९ कोटी.८) अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन आय टी आय सुरू करणार.९) अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यात येणार आहे.१०) ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन ( व्ही एस टी एफ ) अतंर्गत राबविण्यात येत असलेल्या मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी २०२२- २५  ऐवजी २०२८ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.११) नाशिक -त्र्यंबकेश्र्वर कुंभमेळा प्राधीकरण अध्यादेश -२०२५ जारी करण्याचा निर्णय देखील या आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Previous article४ महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या… सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश
Next articleभारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला ५० पेक्षा जास्त दहशतवादी ठार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here