Home अंतर राष्ट्रीय भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला ५० पेक्षा जास्त दहशतवादी ठार!

    भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला ५० पेक्षा जास्त दहशतवादी ठार!

    105
    0

    पुणे ७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळा वर हल्ला क्षेपणास्त्रांनी (मिसाईल) हल्ले केले आहेत . दरम्यान या हल्ल्यात जैश-ए- मोहम्मदसह इतर ५० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले आहेत.दरम्यान भारताने हल्ला मसूद अझहरच्या ठिकाणांवर होता. हे पाकिस्तानी नागरिकांनी मान्य केले आहे.मसूद अझहर च्या एकूण ४ ठिकाणांवर ४ क्षेपणास्त्रे डागली आहेत. अशी माहिती पाकिस्तानी नागरिकांनी दिली आहे.

    दरम्यान जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ भारतीयांचे रक्त सांडले.या रक्ताचा बदला आता आपल्या भारतीय लष्करांनी घेतला आहे. “ऑपरेशन सिंदूर ‘ अंतर्गत पाकिस्तान मधील ९ दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करण्यात आली आहे. दरम्यान भारतीयांशी पंगा घेणे काय असते? हे पुन्हा एकदा भारतीय लष्करांनी अवघ्या जगाला दाखवून दिले आहे.या हल्ल्यात ५० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

    Previous articleअहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीतील ऐतिहासिक राज्यमंत्रीमंडाळाच्या बैठकीत, महायुती सरकारचे ११ महत्वाचे निर्णय घेण्यात आले
    Next articleभारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर नावाने पाकिस्तानातील दहशतवादी तळावर केला हल्ला

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here