पुणे ७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भारतीय लष्करा च्या वतीने ९ दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करून ते तळ संपूर्णपणे नष्ट करून १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा त्यांची जागा दाखवून दिली आहे.दरम्यान ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत भारतीय लष्कराने मुझफ्फराबाद मध्ये दोन.बहावलपूर.कोटली चाकाम्रु.गुलपूर.भीमबेर.मुरीदके.सियालकोट.अशा एकूण ९ ठिकाणी हल्ला केला आहे.त्यामुळे आता पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे.दरम्यान भारतीय लष्कराच्या वतीने हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने सकाळी -सकाळीच तातडीची बैठक बोलवली आहे. तसेच पाकिस्तानने त्यांचे लाहौर व सियालकोट येथील एअरपोर्ट देखील बंद करण्यात आले आहेत.