पुणे १० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पावसाबाबतची अपडेट आली असून.ऐन रखरखत्या उन्हात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.दरम्यान या हवामान बदलाचा मोठा फटाका शेतकरी वर्गाला बसला आहे.आता माताच हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस सतर्क राहावे लागणार आहे.छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड,व लातूर, जिल्ह्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार आहे.तर पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या भागात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.