पुणे १० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही सीमेवरुन आली आहे.भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांनी आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता युद्धविरामची घोषणा केली होती.मात्र कपटी पाकिस्तानकडून युद्ध विराम मोडल्याची अपडेट समोर आली आहे.दरम्यान पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील अखनूरजवळ तोफांनी हल्ला केला आहे.असे म्हटले जात आहे.तसेच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील याबाबत दुजोरा दिला आहे.
दरम्यान युद्धविरामची घोषणा करून ५ वाजता युद्ध थांबवले,पण आता पाकिस्तानकडून अवघ्या तीन तासांमध्ये जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये गोळीबार हा पाकिस्तानकडून होत आहे.तर श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज आले होते.७ ते ८ स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.दरम्यान हा हल्ला पाकिस्तानने रात्री ८ वाजता केल्याची माहिती आहे.दरम्यान श्रीनगर येथे १०० हून अधिक स्फोट केल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान मागील तीन दिवसांपेक्षा आज पाकिस्तानने जास्त स्फोट केले आहे.जम्मूतील इतर भागात देखील हल्ले केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे पाकिस्तान कधीच सुधारणार नाही.हे आता स्पष्ट झाले आहे.दरम्यान पाकिस्तानमधून एक मोठी अपडेट समोर येत आहे. शहाबाज शरीफ सरकारचे म्हणणे मानण्यास पाकिस्तानच्या लष्कराने नकार दिला आहे.असे म्हटले जात आहे.पाकिस्तानकडून भारतातील अनेक ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने हल्ले करण्यात येत आहे. पंजाबच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.त्यामुळे श्रीनगर, राजौरी.राजस्थानमधील पोखरणमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे.