पुणे १६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय लष्कराच्या वतीने राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचा व दहशतवाद्यांचा कणाच मोडून काढला आहे.तसेच पाकिस्तानमध्ये त्यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर फूट पडली आहे. तर इंडियन आर्मी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अॅकशन मोडवर आली आहे.दरम्यान भारतीय लष्कराच्या वतीने हिटलिट्सवरील १४ दहशतवाद्यांची नावे घोषित करण्यात आली आहे.तर ६ दहशतवादी यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.८ दहशतवादी यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान मागील दोन दिवसांमध्ये इंडियन आर्मींने ६ दहशतवादी यांचा खात्मा केला आहे.तर अन्य ८ दहशतवादी इंडियन आर्मीच्या टार्गेटवर आहेत.तर खात्मा केलेल्या ६ दहशतवादी यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.१) जैश- ए मोहम्मदचा आसिफ अहमद शेख २) आमिर नजीर वानी ३) अहमद भट ४) तोयबाचा दहशतवादी एहसान अहमद शेख ५) लष्कर व TRF चा दहशतवादी शाहिद कुटे ६) अदनान शफी डार अशी नावे आहेत.