Home कृषी पुणे व सोलापूरवर आस्मानी संकट, वादळीवाऱ्यासह गारपीट होणार पुढील २४ तास धोक्याचे...

    पुणे व सोलापूरवर आस्मानी संकट, वादळीवाऱ्यासह गारपीट होणार पुढील २४ तास धोक्याचे !

    75
    0

    पुणे १८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात पूर्वमोसमी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.दरम्यान आज रविवारी देखील पुणे व सोलापूर या जिल्ह्यांसह एकूण ३३ जिल्ह्यांना येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत देखील वादळीवाऱ्यासह गारपीट होणार आहे यात प्रामुख्याने पुणे.सोलापूर.सातारा, सांगली, या जिल्ह्यांना देखील हवामान विभागाच्या वतीने दक्षतेचा इशारा दिला आहे.

    दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसामुळे तापमानात देखील मोठ्या प्रमाणावर घट होत आहे.तरी उकाडा कायम आहे.पुणे शहर व जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.तसेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज पुण्यातील तापमान ३४ अंशावर राहिल  तसेच मागील २४ तासांमध्ये सातारा जिल्ह्यात २२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान पुढील २४ तासांमध्ये सातारा जिल्ह्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मुसाळधार पाऊस पडणार आहे. सातारा जिल्ह्यातील तापमान ३३ अंकावर स्थीर राहून पाऊस पुन्हा साता-याला आज झोडपणार आहे.तसेच सांगली जिल्ह्यात वाळवा व शिराळा तालुक्याला देखील पावसाने झोडपून काढले आहे.पुढील २४ तासांमध्ये सांगली व मिरज मध्ये विजांच्या कडकडाटा मध्ये पाऊस कोसळणार आहे.तसेच वारे ४० ते ५०  ताशी किलो मीटर राहणार आहे.या भागाला ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे.तापमान ३४ अंशावर राहिल  तसेच सोलापूर जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह जोरदार व मुसाळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.या ठिकाणी ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे.या भागाचे तापमान हे ३५ अंश सेल्सिअस राहील.कोल्हापूर जिल्ह्यात ☁️ ढगाळ आकाश राहणार आहे.मध्यम स्वरूपाचा किंवा वादळीवाऱ्यासह गड‌गडाटी वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.हवामान मात्र स्थीर राहील . दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता उर्वरीत जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो.या भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.दरम्यान हा अवकाळी पाऊस पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.दरम्यान शेतकरी व नागरिकांनी काळजी घ्यावी असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.दरम्यान राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

    Previous articleसोलापूरात टाॅवेलच्या कारखान्याला भीषण आग, 🔥 आगीत ३ कामगारांचा मृत्यू तर ५ते ६ जण आगीत अडकले
    Next articleपुण्यात गुन्हेगारीचा कळस! गाडीला कट लागला म्हणून रागाच्या भरात बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार , कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here