पुणे २५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडतो आहे, दरम्यान अशातच आता पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तसेच मान्सून देखील गोव्याच्या किनारपट्टीवर दाखल झाला आहे, तसेच पुढील २ दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे,अशी माहिती माध्यमांना भारतीय हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे, दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पुढील ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तसेच महाराष्ट्र मधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे,
दरम्यान केरळमध्ये यावेळी मान्सून लवकरच दाखल होत आहे, दरम्यान दरवर्षी १ जून रोजी दाखल होणारा मान्सून हा यावेळी दिनांक २३ मे रोजीच धडकला आहे, त्यामुळे केरळ, तामिळनाडू, आणि ओडिशा तसेच कर्नाटक या राज्यांना हवामान विभागाच्या वतीने रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे,तर या मान्सूनने आता महाराष्ट्राकडे आगेकूच केले आहे, येत्या २ ते ४ दिवसांमध्ये हा मान्सून कोकण व गोवा मध्ये दाखल होणार आहे,अशी शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे, तसेच दक्षिण कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे,