पुणे २६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट पुणे जिल्ह्या मधून पावसाबाबत आली आहे, महाराष्ट्रात सर्वत्र मुसाळधार अवकाळी पाऊस कोसळत आहे, यामध्ये शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तर कुठे या पाण्यात कार तसेच ट्रॅक्टर व दुचाकी वाहून गेल्या आहेत, तर घराचा स्लॅप तर घराची भिंत कोसळल्याने मृत्यू झाला आहे,तर वीज कोसळून कित्येकांचे बळी गेले आहेत, दरम्यान या अवकाळी पावसाचा निसर्गाचा प्रकोप उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, दरम्यान पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळ धबधब्याचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे, तब्बल १६ वर्षांनंतर मे महिन्यात हा धबधबा प्रवाहित झाला आहे, दरम्यान किती तरी उंचावरून कोसळणा-या पाण्याचा आवाज ऐकूनच मनात धडकी भरत आहे.दरम्यान पुणे जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे,