Home Breaking News ‘महायुतीच्या सरकारने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली ‘, मुंबईच्या तुंब‌ईवरुन आदित्य ठाकरे भडकले,...

‘महायुतीच्या सरकारने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली ‘, मुंबईच्या तुंब‌ईवरुन आदित्य ठाकरे भडकले, मुंबईत ☁️ ढगफुटी सारखा पाऊस पडला शिंदे

94
0

पुणे २६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाभ्रष्ट भाजपा महायुती सरकारने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली आहे, मुंबई च्या रस्त्यावर राज्य सरकार व महापालिकेच्या प्रशासनराजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहत आहे.दरम्यान पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे,व मुंबईच्या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे,असे काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे, तसेच एका पावसाने भाजप शिंदे सेना व अजित पवारांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे, असं देखील त्यांनी म्हटले आहे,

दरम्यान एकनाथ शिंदे हे खोटारडे आहेत.     त्यांनी सांगितले होते की दोन वर्षांमध्ये मुंबई खड्डे मुक्त करु, त्यांच्या खिशातील खड्डे भरलेले आहेत, परंतु मुंबईतील रस्ते अजूनही खड्डे मुक्त झालेले नाहीत,असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर केला आहे, नगरविकास खात्यातील यंत्रणा मुख्यमंत्री ऑफिस हे भ्रष्ट आहेत, दरम्यान आता मिंधेंचा भ्रष्टाचार आता पावसाळ्यात समोर आला आहे, हे महायुती सरकार मुंबईचा द्वेष करत आहे, तसेच चित्र दिसत आहे,असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले की, मुंबईत ☁️ ढगफुटी सारखा पाऊस पडला आहे, नालेसफाईच्या कामाला सुरुवात झालेली आहे, तसेच नालेसफाईसाठी A 1 चा वापर केला जात आहे, दरम्यान मुंबईत जिथे पाणी साचले होते त्याचा निचरा झाला आहे,व तेथील पाणी ओसरले आहे, दरम्यान नरिमन पॉइंट भागात २५२ मिलीमीटर पाऊस झाला आहे, दरम्यान सगळ्या यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत, तसेच पाऊस लवकर आल्यामुळे धावपळ झाली आहे, दरम्यान मुंबई मधील नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडा, सध्या मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, समुद्र किनारी व सखल भागात जाणे टाळावे,असे आवाहन मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे, तसेच महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या अधिका-यांना व कर्मचाऱ्यांना तसेच तसेच पोलिसांना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, मुंबई कराच्या मदतीसाठी पोलिस व महानगरपालि केचे कर्मचारी तत्पर आहेत, कोणत्याही प्रकारची आपात्कालीन परिस्थिती उद्भवली तर १००/ ११२/१०३ नंबर डायल करा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleअवकाळी पावसाने बारामतीत केला कहर; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळीच केली पाहाणी
Next articleवरळी मेट्रोतही पाणीच पाणी, महायुती सरकारच्या कामाची झाली पोलखोल पत्रकारांना फोटो घेण्यास प्रशासनाची बंदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here