पुणे २७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात सर्वत्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तसेच कांदा, फळबागा, तसेच कांद्याच्या वारीत पाणी गेल्याने शेतकरी वर्गाने अक्षरशः कांदा फेकून दिला आहे.ही सर्व परिस्थिती अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आली आहे, त्यामुळे पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने आढावा घेत आहेत, या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासना ला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत, ज्याठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत, राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत,