Home Breaking News आरसीबीच्या विजयी मिरवणूकीत चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू तर २०पेक्षा जास्त जखमी...

आरसीबीच्या विजयी मिरवणूकीत चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू तर २०पेक्षा जास्त जखमी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

91
0

पुणे ४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही बंगळुरू येथून आली आहे, दरम्यान तब्बल १८ वर्षांनी आयपीएलचा कप आरसीबीने जिंकला होता. त्यानंतर आज बुधवारी बेंगळुरू येथील चेन्नास्वामी स्टेडियमवर आज विजयी मिरवणूक काढण्यात आली होती, दरम्यान या स्टेडियमवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली, यावेळी गर्दी हाटविण्यासाठी पोलिसांनी 👮 सौम्य असा लाठीचार्ज केला होता.यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर यात २० पेक्षा अधिकजण गंभीर रित्या जखमी झाले असून यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर यात अनेकजण एकमेकांना ढकलून पुढं जात होते.यात काही जण खाली पडले व चेंगराचेंगरी झाली आहे. दरम्यान आज या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी मोठ्या प्रमाणावर क्रिकेटर चाहते सदर स्टेडियमवर आले होते,

Previous articleविवाह सोहळा आटपून परतणाऱ्या कारला भीषण अपघात ९ जणांचा मृत्यू
Next articleचेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू,विराट कोहलीचे सेलिब्रेशन सुरुच, सरकारकडून विजयी मिरवणूकरद्दची घोषणा चाहत्यांनी घरी जावं असे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here