पुणे ४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर वरुन आली आहे,आज बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीने आयपीएल फायनल सामना तब्बल १८ वर्षांनी जिंकल्यामुळे तिथे क्रिकेटेर यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यावेळी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती,सदरची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी 👮 सौम्य असा लाठीचार्ज केला त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एकूण ११ जणांचा मृत्यू झाला तर ३० पेक्षा जास्त जण जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे,
दरम्यान या ठिकाणी स्टेडियमच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाल्यानंतर देखील विराट कोहली याचे सेलिब्रेशन जोरदारपणे सुरू होते, दरम्यान आता कर्नाटक सरकारच्या वतीने विजयी मिरवणूक सदर चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रद्द केली आहे,तर स्टेडियमच्या बाहेर जमलेल्या लाखो क्रिकेटप्रेमी चाहत्यांना घरी सुखरूपपणे जाण्यासाठी सांगितले आहे,तर या स्टेडियमची संख्यापेक्षा जास्त क्रिकेट चाहते मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्यामुळे सदरची चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडली आहे,सदर दुर्घटनेनंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने काॅग्रेसवर हल्ला केला आहे, सरकारला गर्दी नियंत्रणात करता आली नाही , म्हणून सदरची मोठी दुर्घटना घडली आहे,असे म्हटले आहे. तर एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतर देखील क्रिकेटर विराट कोहलीचे विजयी सेलिब्रेशन सुरुच होते.तर सदर दुर्घटनेत लहान मुलांचा समावेश आहे,विजयी मिरवणूकीला गालबोट लागले आहे,यात २५ पेक्षा जास्त क्रिकेट चाहते हे गंभीर रित्या जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,यात अनेकजणांची प्रकृती चिंताजनक आहे, दरम्यान पोलिसांनी 👮 योग्य असे नियोजन केले नाही, तसेच पोलिसांना गर्दी नियंत्रणात ठेवता आली नाही,असा गंभीर आरोप पोलिसांवर केले जात आहे, दरम्यान आता चेंगराचेंगरीनंतर कब्बनपार्क मेट्रो स्टेशन वरील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे,यात सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची गर्दी आहे,