पुणे ४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर आपल्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी आरसीबीचे चाहते मोठ्या प्रमाणावर पोहोचले होते, यावेळी गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती, त्यामुळे पोलिसांनी 👮 चाहत्यांवर लाठी चार्ज केला,त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे, यामध्ये पोलिस हे चाहत्यांवर लाठीमार करत त्यांना पळवून लावत होते, दरम्यान याच वेळी चेंगराचेंगरी झाली यात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे, यावेळी कर्नाटक राज्य सरकारच्या वतीने माफी मागितली आहे,
दरम्यान बंगळुरू येथील चेंगराचेंगरीला कर्नाटक सरकार जबाबदार आहे,असा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी केला आहे, तसेच या चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे, दरम्यान याबाबत कोणतीही प्रकरची तयारी न करता कर्नाटक राज्य सरकारच्या वतीने स्वतःच्या प्रसिद्धी साठी आयपीएल विजेत्या आरसीबीच्या खेळाडूंसह रॅली काढण्याची घाई केली,त्या मुळेच ११ लोकांचा जीव गेला,असे त्यांनी म्हटले आहे,