पुणे ४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवरील दुर्घटनेत एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३३ जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत, दरम्यान आता या दुर्घटनेची जबाबदारी कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वीकारावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी केली जात आहे,यावर घटनेचे राजकारण करु नये,असे आवाहन कर्नाटकातील राज्य सरकारच्या वतीने केले जात आहे, तसेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य नसल्याचे म्हटले आहे,
दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूतील चेंगराचेंगरीवर दुःख व्यक्त केले आहे, दरम्यान या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे,तर ३३ जण जखमी झाले आहेत, मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे,तर जखमी झालेल्यांवर मोफत उपचार केले जाणार आहे, तसेच चिन्नास्वामी स्टेडियमच्या मैदानाची क्षमता ३५ हजार आहे,मात्र आरसीबीच्या विजयी रॅलीत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची गर्दी झाल्याने दुर्घटना घडल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे ,