पुणे ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून आजपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे गुरुकुंज मोझरी मध्ये संत तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात अन्न त्याग आंदोलनला बसले आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी साठी त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे, दरम्यान देशातील शेतकरी नेते राकेश टिकेत हे उद्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत, यावेळी माध्यामांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की देशात सध्या जातीय रंग देण्याचे काम केलं जातंय, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटवला गेला.त्यामुळे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न मागे पडत चालला आहे, वेळ आली तर हा बच्चू कडू बलिदान करायला तयार आहे,पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे,बाप मेला तरी चालेल,पण नेता जिवंत राहिला पाहिजे,ही व्यवस्था मोडून काढायची आहे,