Home क्राईम थाटामाटात लग्न, नंतर हनिमून अन् भयंकर हत्याकांड, प्रेम संबंधातून केली नव-याची हत्या...

    थाटामाटात लग्न, नंतर हनिमून अन् भयंकर हत्याकांड, प्रेम संबंधातून केली नव-याची हत्या बेवफा सोनम!

    115
    0

    पुणे ९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही उत्तर प्रदेश येथील आहे, दिनांक ११ मे रोजी उत्तर प्रदेश येथे राजा आणि सोनमचा विवाह थाटामाटात लग्न 💒 सोहळा पार पडला व दिनांक २० मे रोजी ते दोघे हनिमून साठी मेघालयाला गेले, दरम्यान सर्व काही सुरळीत सुरू होते, दिनांक २३ मे रोजी ते दोघे बेपत्ता झाले, पोलिसांचा शोध सुरू झाला, तेव्हा २ जूनला पती राजचा मृतदेह सापडला, पण सोनम ही गायबच होती , आता या प्रकरणी या हत्याकांडात मोठा ट्वीस्ट आला आहे,राज याला ठार करणारी सोनमच निघाली , पोलिसांनी 👮 आता सोनम व तिच्या ३ साथीदार यांच्या मुसक्या आवळल्या आहेत,

    दरम्यान उत्तर प्रदेश येथे लग्न झाल्यानंतर २० मे रोजी राज व सोनम हनीमून साठी मेघालय येथील शिलाॅंग येथे गेले होते, दरम्यान पत्नी सोनम हिच्या मनात नेमकं काय चाललंय आहे? पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सोनम एकूण ४ जणांना राजाची सुपारी दिली होती, दरम्यान लग्नाच्या आधी सोनम हिचे राज कुशवाह या व्यक्ती बरोबर प्रेम संबंध होते, यातूनच तिने अगदी थंड डोक्याने राजाची हत्या केल्याचा संशय आहे, पोलिसांनी 👮 सोनम हिच्यासह एकूण तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत, यातील अन्य एक आरोपी फरार आहे, लग्न करून पतीची हत्या करणारी सोनम ही बेवफा निघाली आहे,

    Previous articleजेष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा पुण्यात एकत्र
    Next articleमुंबईत मुंब्रा लोकल दुर्घटनेत GRP रेल्वे कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here