पुणे ९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक क्रिकेट 🏏 क्षेत्रातून खळबळजनक अपडेट आली आहे, दरम्यान आरसीबीने कर्नाटक हायकोर्टात धाव घेतली आहे, बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्याची विनंती एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे, दरम्यान चेंगराचेंगरी नंतर आरसीबी विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे, पण या संपूर्ण प्रकरणात आम्हाला गोवले गेले आहे,असा दावा आता आरसीबीने केला आहे, दरम्यान आरसीबीने आयपीएलचा सामना जिंकताच बंगळुरू मध्ये दुस-या दिवशी विजयी रॅलीत झालेल्या गोंधळात एकूण ११ चाहते यांचा मृत्यू झाला होता,