पुणे १२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) गुजरात मधील अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन २४२ प्रवासी घेऊन लंडनकडे निघालेले एअर इंडिया च्या विमानाने उड्डाण केले होते.उड्डाननंतर सदर चे विमान तांत्रिक बिघाडामुळे लगेच रहिवासी भागात मेघांनी नगर येथील बी जे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळून विमानाने लगेच पेट घेतला, दरम्यान दुर्घटनाग्रस्त विमाना ची अवस्था पाहून असं वाटत होतं की.भयानक असा अपघात आहे, दरम्यान यातील प्रवासी यांचे यातून वाचणं अवघड आहे.आणी नेमके तेच घडले आहे, एअर इंडियाच्या Boeing Dreamliner 787 या विमानातील सर्वच्या सर्व २४२ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान एपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे, दरम्यान गुजरात मधील पोलिस आयुक्तांशी संवाद साधल्यानंतर ही माहिती समोर आली आहे,
दरम्यान या विमानात २३० प्रवासी २ पायलट व १० क्रू मेंबर असे एकूण २४२ प्रवासी होते , यातील १६९ भारतीय प्रवासी ५३ ब्रिटनचे ७ पोर्तुगीज व १ कॅनेडियन असे प्रवासी होते. तर यात १० लहान मुलांचा समावेश होता,तर २ नवजात शिशू होते, दुर्दैवाने या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, दरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होताच विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर एकच गर्दी केली आहे, दरम्यान यातील मृतांना अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे, दरम्यान यातील सर्व प्रवाशांची ओळख पटवणे मुश्कील झाले आहे, तर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की प्रवाशांच्या नातेवाईकांनी डिएनए टेस्ट साठी अहमदाबाद येथील रुग्णालयात संपर्क साधावा , दरम्यान अहमदाबाद येथील रुग्णालयात प्रवाशांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे, दरम्यान आजच्या या विमान दुर्घटना नंतर संपूर्ण देश शोक सागरात बुडाला आहे. तर रशिया व ब्रिटन यांनी देखील शोक व्यक्त केला आहे,या विमान दुर्घटना मध्ये महाराष्ट्र मधील सहा जणांचा समावेश आहे, दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे, दरम्यान हे दुर्घटनाग्रस्त विमान बी जे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळल्याने यात १५ रेसिडेन्सी डॉक्टर जखमी झाले आहेत.