पुणे १२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शेतकऱ्यांना कर्जमाफी व दिव्यांगाना दरमहा ६ हजार रुपये मानधन मिळावे म्हणून अमरावती येथे आमरण उपोषणाला बसलेल्या माजी आमदार व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल महायुती सरकारने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न घेतल्याने आज सकाळपासून प्रहार संघटनेचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.येथे टायर जाळण्यात आले आहे, दरम्यान बच्चू कडू यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाठिंबा मिळत आहे,तर त्यांचे ४ किलो वजन घटले आहे,व त्यांची प्रकृती खालावत चालली आहे,