पुणे १२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सकाळीच राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मुंबईतील वांद्रे येथील ताज लॅंड्स एन्ड या हाॅटेलमध्ये एक तास चर्चा झाली आहे, दरम्यान या दोघांच्या मध्ये नेमकी महाराष्ट्रातील येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत होती का? याबाबत राजकीय वर्तुळात एकच खळबळ जनक चर्चा सुरू झाली आहे,
दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघे भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावेत अशा संपूर्ण महाराष्ट्रात बॅंनर लागले होते,पण आज आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांच्यात मुंबईतील वांद्रे येथील ताज लॅंड्स एन्ड या हाॅटेलमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे, उध्दव भाऊ की देवाभाऊ? आता नेमके राज ठाकरे कोणासोबत? अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागली आहे.तर मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुका दरम्यान ही भेट व बंद दाराआड झालेली चर्चा यात नेमकं काय झाले हे सर्व गुलदस्त्यात दडलं आहे,