पुणे १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे विमानाने २४२ प्रवासी घेऊन उड्डाण लंडन कडे केले होते, दरम्यान उड्डाण घेताच काही सेकंदात हे विमान मेडिकल कॉलेजवर पडले, तसेच विमानाने पेट घेतला व आगीच्या विळख्यात सापडले, यातील सर्व प्रवाशांचे मृतदेह पुर्णपणे जळाले, दरम्यान यातील नातेवाईकानाही आपला व्यक्ती ओळखणे कठीण झाले, यामुळे आता DNA 🧬 चाचणी करण्यात येत आहे, दरम्यान आतापर्यंत २४१ पैकी १९२ नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण झाल्या आहेत, दरम्यान नातेवाईकांचा DNA मॅच झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे,