पुणे १५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काही काळ विश्रांती घेतल्यावर राज्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे, दरम्यान हवामान विभागाच्या वतीने आज रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तसेच रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तसेच पालघर, ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, या जिल्ह्यात देखील पाऊस कोसळणार आहे, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे,तर मुंबई, नाशिक जळगाव, अहिल्यानगर, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे,
दरम्यान मुंबईसह उपनगरात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे, अजून मुंबई शहरात पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे, ठाणे, कल्याण -डोंबिवली ,विरार,वसई येथे देखील पाऊस सुरू आहे, त्यामुळे चाकर मनी यांनी घराबाहेर पडताना रेनकोट व छत्री ☂️ घेऊनच बाहेर पडा,व काळजी घ्या,असे आवाहन करण्यात आले आहे, दरम्यान त्यात आज रविवार असल्याने मुंबईच्या रस्त्यांवर फारशी गर्दी पाहायला मिळत नाही, सध्या तरी रस्त्यावर वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे,असे पाहायला मिळत आहे,