पुणे १५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील मावळ येथील कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे, दरम्यान या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे, दरम्यान या भागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे, तसेच हा पूल कोसळण्यापूर्वी या पूलावर १०० पर्यटक होते, तसेच या नदीत २० ते २५ जण वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे,इथे धबधबा असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक आले होते, तसेच ओव्हरवेटने हा पूल कोसळल्याचे बोलले जात आहे,
दरम्यान ही मोठी दुर्घटना घडली आहे,सदर ठिकाणी १८ रुग्णवाहिका तातडीने दखल झाल्या आहेत, दरम्यान यातील काही पर्यटक यांना नदीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान व पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेचे पथक दाखल झाले आहे, दरम्यान पूल कोसळन्यापूर्वी या पूलावर १०० पर्यटक असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे,