पुणे १५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील मावळ येथील कुंडमळा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत सरकारच्या वतीने केली जाणार आहे,अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे, तसेच यातील जखमींचा वैद्यकीय खर्च सरकार करणार आहे, असे देखील त्यांनी सांगितले आहे, दरम्यान या पुलावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होती, तसेच दुचाकी या पुलावरून जात होत्या,३० वर्षे या पुलाला झाले होते,तसेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करणार आहे की , यामध्ये पोलिस प्रशासनाची चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे,असे देखील त्यांनी म्हटले आहे,